उल्हासनगर, (जि. ठाणे) : ‘‘सत्तेत बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देऊन महायुतीने शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली; पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,’’ अशी टाकी करीत ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केला.