
डहाणू : तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ग्रामीण भाग भिजून निघाला आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने उजळले आहेत. परंतु सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून डहाणू तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवस जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे.