Mumbai High court
Esakal
मुंबई : जवळपास १६ वर्षे कोमात राहिलेल्या एकुलत्या एक मुलीला गमावणाऱ्या पालकांच्या वेदनांची भरपाई पैशात होऊच शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. पीडितेच्या कुटुंबाला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (मॅक्ट) दिलेली सात लाख रुपयांची भरपाईची रक्कम ३७ लाखांपर्यंत वाढवून देण्याचे आदेश न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने विमा कंपनीला दिले.