mumbai high court
sakal
मुंबई : मानवी तस्करीची बळी ठरलेल्या एका बांगलादेशी महिलेचा जबाब नोंदवण्याचा स्पष्ट आदेश देऊनही आजमितीस तिचा जबाब का नोंदवला नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने नुकताच उपस्थित केला. त्यासंदर्भात सत्र न्यायालयाकडून स्पष्टीकरणही मागितले. या महिलेला परत मायदेशी पाठवणे आवश्यक असल्याने सत्र न्यायालयाने २४ मार्चपर्यंत तिचा जबाब नोंदवावा, असे आदेश न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाला दिले. सध्या ‘रेस्क्यू फाउंडेशन’कडून महिलेची देखभाल केली जात आहे.