Mumbai High court
Esakal
मुंबई : नवी मुंबईस्थित हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटने दाखल केलेल्या ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २४) राज्य सरकारला दिले. अन्नसुरक्षा नियमांचे १०० टक्के पालन करून ते सिद्ध होऊनही परवाने निलंबित ठेवल्याबद्दल झालेल्या नुकसानीसाठी हॉटेलने हा दावा केला आहे.