

Kanjurmarg Landfill Crisis
ESakal
मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीतील दुर्गंधी आणि दीर्घकालीन प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून अधिक इच्छाशक्ती आणि वचनबद्धता आवश्यक आहे, असे निरीक्षण मंगळवारी (ता. २४) उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी तांत्रिकरीत्या देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेची तातडीची गरजही न्यायालयाने बोलून दाखवली. त्यासोबतच कचराभूमीतून निघणारी दुर्गंधी आणि प्रदूषण रोखण्यासाठी अल्पकालीन उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.