

मुंबई: सरकारने रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान दरात तीन रुपयांनी वाढ केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ऑटोरिक्षाचा दर पहिल्या टप्प्यासाठी २३ रुपये इतका होता. त्यात वाढ होऊन तो आता २६ रुपये इतका झाला आहे. टॅक्सीचा पहिल्या टप्प्यातील किमान दर २८ रुपये होता, त्यात वाढ होऊन तो आता ३१ रुपये झाला आहे.