वादळाचा धोका टळला, पण... सकाळपासून मुंबईत मुसळधार सुरूच!

वादळाचा धोका टळला, पण... सकाळपासून मुंबईत मुसळधार सुरूच!

मुंबई: मुंबईतील काही भागात आज सकाळ पासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे.दुपारी 1 वाजे पर्यंत मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी, भांडूप, मालाड, दादरसह काही भागात जोरदार पाऊस कोसळत होता. 

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असुन आता कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.याचा प्रभाव सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागावर असून आज रात्री पर्यंत मराठवाडा परीसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. 

निसर्ग चक्रिवादळाने काल संपुर्ण रायगड जिल्ह्यात थैमान घातले. रायगडमधून हे वादळ ठाणे  मुंबई परीसरात येण्याची शक्यता होती.मात्र,संध्याकाळनंतर वादळाचा वेग कमी झाल्याने दिशा बदलल्याने हे वादळ पुण्याचा दिशेने सरकु  लागले.

राज्याच्या सागरी किनार्यावरील जिल्ह्यातून 60 हजार पेक्षा जास्त जणांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत करण्यात आले आहे. एकट्या मुंबईत 18 हजारहून अधिक नागरीकांना स्थालांतरीत करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com