

Funding Crunch Halts 24,000 Water Schemes Under Jal Jeevan Mission
sakal
-सदानंद पाटील
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जलजीवन मिशन''ला राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही स्तरांवरून निधीचा मोठा फटका बसत आहे. केंद्राकडून गेल्या दीड वर्षांच्या काळात १६ हजार कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना, राज्याच्या पदरात अवघे १२ कोटी ५० लाख रुपये पडले आहेत. विशेष म्हणजे, हा अत्यल्प निधीही आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी (३१ मार्च) प्राप्त झाल्याने पाणीपुरवठा विभाग हतबल झाला. निधीअभावी राज्यभरातील सुमारे २४ हजार पाणी योजनांची कामे ठप्प असून, आगामी उन्हाळ्यात ग्रामीण महाराष्ट्राच्या पाणीटंचाईत आणखी भरच पाडण्याची भीती आहे.