

MVA Protest Over Water Crisis
ESakal
पनवेल : नवीन पनवेल शहरात सणासुदीच्या काळापासून तीव्र पाणीटंचाई आहे. दीर्घकाळापासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना सिडको प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी रात्रभर वणवण करावी लागत आहे. तरी सिडकोचे अधिकारी बेफिकीरपणे वागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.