

मुंबई: ‘राज्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे गाजर दाखवून सरकारने राज्यावरील कर्ज सहा पटीने वाढवले आहे. ११.२ लाख कोटींच्या कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र अडकला असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ ''घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ'' आहे, अशा जळजळीत शब्दांत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पी चर्चेवेळी सरकारचे वाभाडे काढले. तसेच रस्ते आणि मेट्रोच्या नावाखाली केवळ विशिष्ट कंत्राटदारांचे भले करण्याचा आणि ''मलाई'' खाण्याचा उद्योग सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.