डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीतील खराब रस्ते (potholes), त्यावरील खड्डे यावरून नेटकऱ्यांनी पालिका प्रशासनाला (kdmc) चांगलेच धारेवर धरले आहे. बुधवारी अभियंता दिन सर्वत्र साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधत नेटकऱ्यांनी (social users) कल्याण डोंबिवलीतील रस्ते बनविणारे अभियंता सोडून इतर अभियंत्यांना अभियंता दिनाच्या (Engineers day) समाज माध्यमावर शुभेच्छा दिल्या. तसेच खड्ड्यात जा कल्याण डोंबिवली अशी टॅग लाईन (Tagline trolling) करत पुन्हा पालिका प्रशासनाला ट्रोल केले आहे. नागरिकांच्या या प्रतिक्रियेमुळे पालिका अभियंता काहीसे हिरमुसले आहेत.
कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या खड्ड्यांचे राजकारण दरवर्षी केले जाते. निवडणूकीआधी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांसाठी 472 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. या रस्त्यांच्या कामाचा नारळ फोडून भाजपाने शुभारंभ देखील केला. मात्र रस्ते झाले नाहीत. 2019 मध्ये ज्येष्ठ संगीतकारहृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील खड्ड्यांवरून संताप व्यक्त केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे डोंबिवली दौऱयावर असताना त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. त्यानंतर मनसेने तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल चढविला होता. तसेच मनसेने या आधी पालिकेला खड्डेरत्न पुरस्कार दिला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील रस्ते खराब असून वाहतूक कोंडीची समस्याही सुटलेली नाही. यंदा महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याने रस्त्यांच्या विकास कामावरून सत्ताधारी पक्षाने श्रेय लाटण्यास सुरवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी चांगलीच झोड घेतली. मात्र आता सामान्य नागरिकांनी पालिका प्रशासनाला खड्ड्यांवरून धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. कोपर पुलावर पडलेल्या खड्यांमुळे हा विषय जास्त चर्चेत आला. त्यानंतर मनसे आमदारांनी केलेली पालिकेची नवी व्याख्या. आणि आता अभियंता दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी पालिकेला ट्रोल केले आहे.
"खड्ड्यात जा असे बोलण्या ऐवजी कल्याण डोंबिवलीत जा असे म्हणतात", "डोंबिवली मधील रस्ते बनविणारे इंजिनिअर सोडून इतर सर्व इंजिनिअरना शुभेच्छा" असे संदेश नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. नागरिकांच्या या प्रतिक्रियेमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतील अभियंता काहीसे हिरमुसले आहेत. मात्र केवळ वाईट वाटून घेण्यापेक्षा एकदाच असे रस्ते बनवा की पुढील काही वर्षे पहावे लागणार नाही असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
"महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे खडी भरून बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सूरु आहे. पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करून हे खड्डे बुजविले जातील."
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.