एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात खडसेंचं मोठं विधान

एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे कोण आहे हे भविष्यात समोर येईल : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
Khadse's big statement regarding Eknath Shinde's rebellion
Khadse's big statement regarding Eknath Shinde's rebellion

डोंबिवली - राज्यात सुरू असलेले राजकारण पाहता, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे दिसत असले तरी, या शिंदे यांच्या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्या शक्तीमुळे हे घडत असावे, असे म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणात केले. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार सोहळा रविवारी कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खडसे कल्याण मध्ये आले होते.

खडसे पुढे म्हणाले, कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल. गेल्या ४० वर्षात अस राजकारण मी अनुभवलं नव्हतं. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कोणा बरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केलय, शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल अशी स्थिती आहे. यामध्ये अस चित्र दिसतंय की एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो त्या निर्णय नुसार, या तांत्रिक बाबींची सोडवणून झाल्याशिवाय प्रश्न निकाली निघणार नाही.

सत्कारा दरम्यान एकनाथ खडसे यांनी माझ्या मागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचे काम तुम्हीं केलंय मी राज्याचा आमदार आहे, कधी ही मला बोलवा मी येईन येत्या काही महिन्यात महिन्यातून एकदा एक दिवस कल्याण मध्ये तूमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेन अस सांगितलं.

प्रमाणिकपने काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जमिनीचे आरोप झाले, इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही, मात्र राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलय. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होत. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला ,माझा जावई ,माझ्या दोन्ही मुली ,माझी पत्नी ,यांच्या मागे चौकशी लावली , सगळ कुटुंब आठवड्याला इडी कार्यालयात बसते. मी काय गुन्हा केलाय, कुठे पैसे खाल्ले, काय घेतलं तुम्ही दाखवा ना ? असा भावनिक सवाल त्यांनी केला .

पुढे बोलताना मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले एक रुपया ठेवला नाही. पहिले खाते सिज केलं आता पैसे काढून टाकले,त्यानंतर राहते घरं दहा दिवसात खाली करण्याची नोटीस आली असा नाथा भाऊने काय गुन्हा केला? न्यायालयातून जावून स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय, असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं. अस करायचं असतं तर अनेकांना मला छळता आलं असतं, माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते. न्यायालयाने संरक्षण दिलं म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत, नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली ,मदत केली नाही तर नाथाभाऊ होत्याच नव्हता झाला असता असे देखील ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com