किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेअर केला पालिकेचा अहवाल

किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेअर केला पालिकेचा अहवाल

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र फैलाव केला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यातली परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोमय्यांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल अंतर्गत अहवालाबद्दल सांगितलं आहे. ठाकरे सरकारचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या अहवाल सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या अहवाल शेअर करुन कोरोनाबाधितांचा वाढता आकडा यावर लक्ष केंद्रित करुन दिलं आहे. 

16 जून मुंबई महापालिकेमध्ये 862 कोरोना मृत्यूची नोंद झाली, ज्यांचा पूर्वी नैसर्गिक (non-corona) मृत्यू म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 16 जूनला बीएमसीनं निवदेनात मुंबईत 3165 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 15 जूनला 2248, (862 जुनी सुधारणा), 16 जूनला 55 जणांचा मृत्यू, असं ट्विट भाजप नेत्यानं केलं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या बुलेटिननुसार, 1,13,445 प्रकरणे असलेले महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य आहे. यात 50,057 सक्रिय प्रकरणे आहेत.

मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले की, राज्यात कोविड-19 मुळे अतिरिक्त 1,328  मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यूचे प्रमाणपत्र आणि कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे जुळली. यात अतिरिक्त 5,071 पॉझिटिव्ह केसेस आढळून आली आहेत. ज्यांना घरीही सोडण्यात आले आहे. 1,328 मृत्यू इतर कारणांमुळे मृत्यूमुखीच कोविड पॉझिटिव्ह आहेत. कोविड पॉझिटिव्ह म्हणून विविध कारणांमुळे अतिरिक्त 1,328 जणांचा मृत्यू झाला असं मेहता यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला सांगितलं. 

पुढे त्यांनी म्हटलं की, कोविड 19 चा डेटा सुरुवातीला व्यक्तिचलितरित्या व्यवस्थापित करण्यात यायचा आणि आता हा डेटा पोर्टलद्वारे करण्यात येतो. म्हणून, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना अंतिम निकालासह निर्णायक किंवा दुर्दैवी मृत्यू अशा एकूण सकारात्मक प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी एक पत्र पाठविले गेले होते.

राज्य मुख्य सचिवांनी माहिती दिली होती की राज्य सरकारच्या पूर्ण पारदर्शकतेचे धोरण लक्षात घेऊन हा डेटा सार्वजनिक क्षेत्रात ठेवला जात आहे. मृत्यूची संख्या नियंत्रणात राहिल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही आणि ते आणखी कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात फडणवीसांनी आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असंही फडणवीसांनी विचारणा केली आहे. 

सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला, तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणं नॉन-कोव्हिड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com