मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कोरेगाव भीमा तपासावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बिघाडी झालीये का असे देखील प्रश्न उपस्थित केले जातायत. अशात कोरेगाव भीमा प्रकरणी ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली त्यापैकी अनेकांचे गुन्हे मागे घेण्यात आलेत.
कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. विधान परिषदेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान गृहमंत्र्यांनी सदर माहिती दिली आहे.
यासोबतच मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली यावेळी बोलताना दिली आहे.
दरम्यान शेकडो लोकांचे गुन्हे जरी मागे घेण्यात आले असले तरीही ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे अशा लोकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.
काय म्हणालेत अनिल देखमुख :
koregaon bhima and maratha agitation hundreds of cases are scrapped by maharashtra police
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.