मिरा भाईंदरमधील शिधावाटप दुकानांवर मोफत धान्याचा दुष्काळ

मिरा भाईंदरमधील शिधावाटप दुकानांवर मोफत धान्याचा दुष्काळ
Grain market

भाईंदर : कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून हे धान्य वाटप केले जात आहे. परंतू मिरा भाईंदरमधील शिधावाटप दुकानांमध्ये गेल्या एक महिन्यापासून मोफत धान्य योजनेतून धान्य पुरवठाच झालेला नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी हजारो नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. कोरोना काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला असल्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना शिधावाटप दुकानांच्या माध्यमातून 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहेत. परंतू धक्कादायक बाब म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी लागणारे धान्य मिरा भाईंदरमधील शिधावाटप दुकानांना सरकारकडून पुरवण्यातच आलेले नाही. त्यामुळे दुकानांमधून खडखडाट झाला आहे. कोरोनाचा मार बसलेलेल पीडित नागरिक मोफत धान्य मिळण्याच्या आशेने दररोज शिधावाटप दुकानांच्या फेर्‍या मारत आहेत. मात्र त्यांच्या पदरी धान्या ऐवजी निराशाच पडत आहे. मिरा भाईंदरमध्ये 106 शिधावाटप दुकाने असून प्रत्येक दुकानांशी अडीचशे ते तीनशे नागरिक जोडलेले आहेत. हे हजारो नागरिक आज धान्याच्या प्रतिक्षेत बसले आहेत.

मिरा भाईंदरमधील शिधावाटप दुकानांवर मोफत धान्याचा दुष्काळ
दहावीच्या गुणांवर अकरावी प्रवेश प्रक्रिया सहा आठवड्यात पूर्ण करा- हायकोर्ट

जुलै मध्ये शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त शिधावाटप दुकानांना धान्य मिळालेले नाही. काहींना तांदूळ मिळाले तर गहू नाही, काहींना तर दोन्ही नाही अशी परिस्थिती आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य दुकानांना मिळत असते त्यानंतर ७ तारखेपासून धान्य वाटपाला सुरुवात होत असते. मात्र आता ऑगस्ट महिन्याची 10 तारीख उलटल्यानंतरही चालु महिन्याच्या धान्याचा पत्ता नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुसरा महिना देखील धान्यावाचूनच जातो की काय अशी नागरिकांची परिस्थिती आहे.

मोफत धान्याची ही परिस्थिती असताना जे धान्य शिधावाटप दुकानात पैसे देऊन मिळते त्याचा पुरवठा देखील झालेला नाही. चणा डाळीसाठी पैसे भरुन एक वर्ष झाले मात्र सरकारकडून अद्याप डाळ मिळालेली नाही. सरकार धान्य पाठवत नाही मात्र नागरिकांचा रोष दुकानदारांवर आहे. दुकानदार धान्य परस्पर बाहेर विकतात असा नाहक आरोप केला जात अशी भावना एका दुकानदाराने व्यक्त केली.

सरकारी गोदामातून धान्य आले नसल्यामुळे त्याचे वितरण शिधावाटप दुकानांना झालेले नाही. यासाठी पाठपुरवठा सुरु आहे. धान्याचा पुरवठा झाल्यावर त्याचे तातडीने वितरण करण्यात येईल - जितेंद्र पाटील, शिधावाटप अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com