

Government Employees Strike
ESakal
पालघर : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांवर पडत असलेला कामाचा ताण आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचारी कृती समिती अंतर्गत सोमवार (ता. २३) पासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी शासन दरबारी केली होती.