मुंबई: कोविड-19 च्या उद्रेकाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास 70% कर्करुग्णांना जीवरक्षक शस्त्रक्रिया तसेच उपचारांपासून वंचित राहावे लागले. केमोथेरपी तसेच फॉलो-अप पुढे ढकलण्यात आले. अगदी मुख्य भारतीय शहरांमधील कर्करोग देखभालीसाठी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जाणाऱ्या रूग्णसंख्येत आसपास 50% ने घट झाली. 2019 च्या तुलनेत शस्त्रक्रियांमध्ये देखील एक-पंचमांश टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. मात्र, आता कोविड काळानंतरही रुग्णालयांनी कर्करोगावरील विशेष काळजी घेतली पाहिजे.
सर्व रुग्णालयांकडून घेण्यात येणारी सर्वसामान्य खबरदारी
विशेष सर्जिकल ऑन्कोलॉजीबाबत खबरदारी
विशेष केमोथेरपी खबरदारी
रुग्णालयातील भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादीत राहावी यासाठी सिटीकरिता आलेल्या बहुसंख्य रुग्णांना सिंगल-ड्रग थेरपी देण्यात आली. ज्या थोड्याफार रुग्णांना मल्टी-ड्रग सिटीची आवश्यकता होती, त्यांना देखील परिणामांशी तडजोड न करता सिंगल-ड्रग सीटी देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आणि संसर्गाचा प्रादुर्भाव होण्यास अटकाव झाला.
रेडियोथेरपीबाबतची खबरदारी
कर्करोगग्रस्त 50% रुग्णांमध्ये आरटीची आवश्यकता असते, सुमारे 40% पर्यंत रुग्ण कर्करोगातून मुक्त होतात. मात्र अलीकडे उद्भवलेल्या महामारीच्या स्थितीत, बहुतांशी केसमध्ये आरटी उपचार ‘ट्रीटमेंट ऑफ चॉईस’ बनला.
कर्करोग संशोधनावर परिणाम
सध्याच्या कठीण परिस्थितीत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि आरोग्य-निगा कर्मचारीवर्गाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली, यात निश्चितपणे दुमत नसावे. तरच जोखीम-लाभ गुणोत्तर लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. आरोग्य-देखभाल व्यवस्थापनाशिवाय, संसर्ग उद्रेकाचा सर्वाधिक परिणाम झालेले क्षेत्र हे कर्करोग संशोधनाचे आहे. भारतात कर्करोगाकरिता प्राप्त होणाऱ्या निधीत 5% ते 100% पर्यंतची घट झाल्याचे हाती आलेल्या निष्कर्षातून स्पष्ट होते. कारण बहुसंख्य फंडींग एजन्सींनी हात आखडता घेतला. खासगी/ सेवाभावी क्षेत्राला महासाथीचा मोठा फटका बसला. निधी रकमेत सुमारे 60% अधिकची घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. कर्करोग संशोधन करणाऱ्यांच्या दृष्टीने ही बाब चिंतेत टाकणारी आहे. या परिस्थितीमुळे कर्करोग संशोधनातील प्रगतीला बाधा निर्माण झाली.
कर्करोग देखभाल ही प्रत्येक रुग्णाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. अगदी गंभीर स्वरुपाच्या महासाथी दरम्यान शुद्ध-गुंतागुंतारहित आणि काळजीपूर्वक प्रोटोकॉलची अंमलबजावणी जास्त गरजेची ठरते. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रारंभिक काळात आणि समन्वय राखून नियोजन करावे. जेणेकरून किमान परिणामांसोबत कर्करोग बाधितांची सेवा करण्यासाठी युनिट सज्ज होतील.
पॉझिटीव्ह एचसीडब्ल्यूसोबत कमीत-कमी/शून्य संपर्क राखणे, अलगीकरण तसेच विलगीकरण यासाठी पुरेशा आणि योग्य त्या उपाययोजना राबवणे, जेणेकरून कर्मचारी आणि रुग्णांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. या प्रकरणी व्यवस्थापन, प्रशासन आणि राज्यातील आरोग्य प्रशासनकर्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मागील वर्षांच्या तुलनेत महासाथी दरम्यान 30 टक्क्यांहून अधिक रुग्णांना संसर्गाच्या प्रमाणाबाहेरील भीतीपायी गुणवत्तापूर्ण आरोग्य देखभाल उपलब्ध होऊ शकली नाही.
कर्करोग रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये
( लेखक - डॉ. राकेश बधे, वोक्हार्ट रुग्णालय, ऑन्को-सर्जन )
------------------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Learn about the planning and treatment of cancer patients in the Covid period
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.