

36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
sakal
मुंबई : राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीवर आज मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या अंतर्गत राज्यातील तब्बल ५५ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, या योजनेची अधिकृत घोषणा न करता मंत्रिमंडळाने या प्रस्तावास केवळ औपचारिक मान्यता दिली आहे.