नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

Cyber attack
Cyber attack

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार तसेच समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात 500  गुन्हे दाखल झाले असून 262 व्यक्तींना अटक केली आहे.

राज्यातील विविध पोलिस स्टेशन मध्ये एकूण 500  गुन्ह्यांची नोद करण्यात आली आहे. त्यात 34 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 196 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 206 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आक्षेपार्ह टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 27 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी  9 गुन्हे दाखल झाले आहेत, तर इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य समाज माध्यमांचा गैरवापर केल्या प्रकरणी  58 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  262आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 107 आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात आल्या आहेत.

सध्याच्या काळात बरेच लोक समाज माध्यमांचा जास्त प्रमाणात वापर करत आहेत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.  ऑनलाईन पुस्तके, साहित्य, गाणी, चित्रपट, वेबसेरीज आणि अन्य गोष्टी अधिकृत संकेतस्थळावरून विकत घ्यावे किंवा बघावे. अशा गोष्टी अनधिकृत संकेतस्थळांवर बघणे हा कायद्याने गुन्हा आहेच, तसेच अशा संकेतस्थळांवरून तुमच्या नकळत एखादे मालवेअर किंवा संगणक व्हायरस येऊन तुमचा संगणक किंवा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना सजग राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com