
devendra fadnavis ajit pawar eknath shinde
esakal
महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे शेतकरी, दुकानदार आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ही मदत साध्या आणि पारदर्शक पद्धतीने दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सांगितले.