

Maharashtra Land Dispute
ESakal
मुंबई आता ग्रामीण भागातील घरे आणि शेतजमिनींवरील अटींच्या उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये लोकांना मंत्रालयाकडे फिरावे लागणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे की, आता घरे आणि शेतजमिनींच्या अटींच्या उल्लंघनाची प्रकरणे नियमित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. यापूर्वी हा अधिकार महसूल मंत्र्यांकडे होता. या संदर्भात एक राजपत्र जारी करण्यात आले आहे.