

Seeds And Fertilizers Complaint New Rule
ESakal
खरीप हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले आहे की, सरकार शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके पुरवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आता, बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत किंवा खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार असल्यास तिचे निराकरण अत्यंत जलद आणि पारदर्शकपणे केले जाईल.