

Government Quarters Must Be Vacated After Transfer Certificate Mandatory for HRA, TA
ESakal
बदली होऊनही शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. मुंबईबाहेर बदली झाल्यास कर्मचाऱ्याला शासकीय निवासस्थान रिकामे करावे लागेल. निवासस्थान रिकामे करताना सामान्य प्रशासन विभागाकडून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. जोपर्यंत हे प्रमाणपत्र नवीन बदली कार्यालयात सादर केले जात नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्याला घरभाडे किंवा प्रवास भत्ता मिळणार नाही.