
मुंबई : राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करावे, स्थानक व आगारांमध्ये उभ्या असलेल्या बस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची १५ एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याची सूचनाही करण्यात आली आहे.