

Mumbai
esakal
मुंबई: महाराष्ट्रातील बेपत्ता बालकांची समस्या गंभीर बनत असल्याचे एनसीआरबीच्या निष्कर्षांनुसार दिसून आले आहे. २०२४ मध्ये राज्यात ३,४९५ बालके बेपत्ता झाल्याची नोंद झाली. तसेच, वर्षभरातील प्रकरणांसह हरवलेल्या बालकांची सक्रिय संख्या ५,५४० इतकी आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक असून सक्रिय प्रकरणांमध्ये ३,१६५ मुली, २,३७२ मुले, ३ तृतीयपंथी बालकांचा समावेश होता.