

Maharashtra Rain Break Hits 83 Talukas For Over 20 Days Groundwater Falls And Kharif Crops Face Growing Damage Risk
sakal
मुंबई : राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी ओढ दिली असून, पिके बहरण्याच्या काळातच पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. दररोज २.५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसाचा तांत्रिक निकष पाहता, राज्यातील चार विभागांमधील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घकालीन पर्जन्यखंड नोंदवला गेला आहे.