

Mumbai Heat Wave
ESakal
डोंबिवली : कोकण आणि मुंबई महानगर परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही तापमानाने चाळीशी ओलांडत थेट ४२ अंशांपर्यंत मजल मारल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून यंदाच्या वर्षातील हे उच्चांकी तापमान असल्याची माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.