

Smart Meter Effect
ESakal
मुंबई : महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जात असून, त्याचे इफेक्ट आता दिसू लागले आहेत. महावितरणने पाठवलेले वीजबिल वेळेत न भरलेल्या एक लाख २१ हजार जणांचा रिमोटद्वारे प्रथमच वीजपुरवठा खंडित करून त्यांना शाॅक दिला आहे. त्यामुळे जवळपास ८० हजार ग्राहक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी तत्काळ बिल भरले आहे, तर जवळपास ४१ हजार ग्राहकांनी अद्याप बिल न भरल्याने त्यांच्या घरात अंधार असल्याचे समोर आले आहे.