Navi Mumbai: दुष्काळात तेरावा! उपनगरात विजेचं महासंकट, तळोजा उपकेंद्रात भीषण आग; वीजपुरवठा खंडित

Navi Mumbai Power Crisis: नवी मुंबई विजेचं महासंकट निर्माण झाले असून अशातच तळोजा उपकेंद्रात भीषण आग लागल्याची घटना घडली. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
Navi Mumbai Power Crisis

Navi Mumbai Power Crisis

ESakal

Updated on

खारघर : तळोजा फेज-दोन येथील सेक्टर २६ मधील महावितरणच्या उपकेंद्रात रविवारी (ता. ८) मध्यरात्री अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली. यामध्ये विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उकाड्याच्या दिवसांत वीज गेल्यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com