

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्य विधीमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी महायुतीच्या १७३ आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ दिली. मात्र, ईव्हीएम, निवडणूक आयोगामुळे सरकारला बहुमत मिळाल्याचा ठपका आणि मारकडवाडीतील ग्रामस्थांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आला.