मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारच्या भूमिकेची माहिती दिली. मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर चर्चा झाली असून, याबाबत अंतिम प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे. ही बैठक मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.