

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव आला असून, सरकार लवकरच यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार असून, यात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरता येईल का, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.