

Marathi Language In School
ESakal
संजीव भागवत
मुंबई : राज्यातील कार्यरत असलेल्या केंद्रीय मंडळाच्या आणि विशेषत: सीबीएसई आदी मंडळांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्याचा कायदा राज्यात लागू असतानाही त्याची अजूनही नीट अंमलबजावणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे. यात अर्ध्याही विद्यार्थ्यांना मराठीचा विषय देण्यात आला नसल्याने मराठी विषयाला थेट डावलेले जात असल्याचेही दिसून आले आहे.