Mumbai Summer Heat
Esakal
मुंबई : एप्रिल महिना संपता संपता मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस 'उष्ण आणि दमट' हवामानाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता उन्हाच्या कडाक्यासोबतच घामाच्या धारांचाही सामना करावा लागणार आहे.