Mumbai Weather: मार्चमध्येच मुंबईकर होरपळले! उष्णतेचा पारा ४२.४ अंशांवर, हवामान विभागाचा काही दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’

Mumbai Temperature Today: मुंबईसह उपनगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४२.४ अंशांवर पोहोचला आहे. तसेच हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Temperature

Mumbai Temperature

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात उन्हाळ्याचा कडाका वाढला असून, मुंबईही होरपळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. १०) मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेच्या तीव्र लाटेचा तडाखा बसला असून, सांताक्रूझ वेधशाळेत तब्बल ४० अंश तापमानाची नोंद झाली; मात्र उपनगरांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर असून, राम मंदिर परिसरात पारा ४२.४ अंशांवर पोहोचल्याने मुंबईकर अक्षरशः भाजून निघाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com