

Mumbai Metro-5
ESakal
ठाणे शहर : ठाणे, भिवंडी आणि कल्याण या उपनगरांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘ऑरेंज लाइन’ (मेट्रो-५) प्रकल्पाने अखेर वेग घेतला आहे. ठाण्यातील कापूरबावडी नाका परिसरातील मार्गातील शेवटचा आणि सर्वात कठीण तांत्रिक अडथळा यशस्वीपणे दूर करण्यात आला आहे.