

Maharashtra Government Targets Unused MIDC Land 5500 Acres to Be Reclaimed From Industrial Plot Holders
sakal
मुंबई : राज्यभरातील विविध ठिकाणी अनेक उद्योजकांनी औद्योगिक वसाहतींमध्ये राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) सवलतीच्या दरात घेतलेली सुमारे साडेपाच हजार एकर जमीन उद्योग न उभारताच वापराविना पडून आहेत. उद्योग विभागाने या जमिनी परत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, सुमारे २९०० उद्योजकांना याबाबत नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.