
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील बहुतांश रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे १० जुलैपर्यंत भरण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, तसेच महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते, मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मिरा-भाईंदरच्या हद्दीतून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर-ठाणे महामार्गाचीदेखील वाईट अवस्था झाली आहे.