

Mumbai Metro
विरार - वसई विरारकराची नायगाव आणि भाईंदर दरम्यान वाहनासाठी पुलाची मागणी बऱ्याच वर्षापासून सरकार दरबारी पडून होती. आता या मागणीला यश येत असून भाईदरवरून वसई-विरारला रस्तेमार्गे अतिजलद जाता यावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो १३ (मिरा-भाईंदर ते वसई विरार) मार्गिके अंतर्गत दुमजली खाडी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.