Mixed Environmental Report
sakal
- पांडुरंग म्हस्के
मुंबई - सामाजिक वनीकरण, शहरी हरित मोहिमा आणि वृक्षलागवड कार्यक्रमांमुळे राज्यातील वृक्षाच्छादन वाढले आहे. असे असले तरी जंगलांच्या मूळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्याच्या यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर सांडपाण्यावर प्रक्रियेच्या अपुऱ्या सुविधांमुळे नदी प्रदूषणात वाढ झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.