

Third Mumbai
ESakal
मुंबई : रायगड जिल्ह्यात कर्नाळा-साई-चिरनेर पट्ट्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तिसरी मुंबई साकारणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाला चालना मिळाली असून, तब्बल पाच हजार एकर जमीन देण्याबाबत जमीनमालकांनी सहमती दिली. ५५० एकर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एमएमआरडीएला मिळाला आहे.