
डोंबिवली : ईव्हीएममशीन मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या भाजपा शिंदे यांची राजकीय खेळी सुरु असल्याची टिका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या टिकेला आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठणकावून उत्तर देत सांगितले आहे की राजू पाटील जिंकले असते तर त्यांनी हा मुद्दा उचलला नसता. ते पडले तसेच त्यांच्या विरोधात आम्ही लढलो म्हणून हा आकस असू शकतो. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. परंतू आता आम्ही दणकून निवडून आलो आहोत, तर ठणकावून उत्तर देतो असे भोईर म्हणाले आहेत.