
डोंबिवली : "कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला लागलेले ग्रहण दूर करायचे असेल, तर पालिकेत भाजपचा महापौर बसवा," असे आवाहन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते राजू पाटील यांनी चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत, "शिवसेनेच्या 30 वर्षांच्या सत्तेतील भाजप हा भागीदार आहे. त्यामुळे विकास थांबवणाऱ्या ‘चांदभाई’चे नाव घ्या, नाहीतर जबाबदारीपासून पळ काढू नका," असा खडा सवाल उपस्थित केला.