तुम्ही मंत्रालयात येण्यासाठी याचिका करु की, आंदोलन? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याच्या मागणीसाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आग्रही होते.
तुम्ही मंत्रालयात येण्यासाठी याचिका करु की, आंदोलन? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी काल रात्री राज्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी येत्या १५ ऑगस्टपासून म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून लसीचे दोन डोस (Vaccine two doses) घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास (Local journey) खुला होणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे भाजपा (Bjp) आणि मनसेने स्वागत करताना टोलाही लगावला आहे. कारण मनसे आणि भाजपाने लोकल प्रवास खुला करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

भाजपाने रेल्वे स्थानकात आंदोलनही केले होते. राजकीय पक्ष आणि जनतेच्या मागणीमुळे अखेर उद्धव ठाकरेंना लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा करावी लागली आहे. ही सुविधा फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळवून देण्याची सुविधा असणार आहे, असे उद्धव यांनी सांगितले.

तुम्ही मंत्रालयात येण्यासाठी याचिका करु की, आंदोलन? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
ED अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला समन्स बजावण्याच्या तयारीत

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याच्या मागणीसाठी सातत्याने आग्रही असणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच टोलाही लगावला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्याच मुद्यावरुन त्यांनी "आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा" असे उपरोधिकपणे म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com