KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

Suresh Mhatre : केडीएमसीतील २७ गावे निवडणुकीनंतर बाहेर काढणार असाल तर आताच निवडणूक रद्द करून स्वतंत्र महानगरपालिका करा; जनतेच्या कराचे पैसे वाया घालवू नका, असा संतप्त सवाल खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केला.
KDMC News

KDMC News

Sakal

Updated on

डोंबिवली : नवी मुंबईतील 14 गावाप्रमाणेच केडीएमसीतील 27 गावे पण उद्या बाहेर काढणार असे सत्ताधारी बोलतील. मग निवडणुकीवर होणाऱ्या खर्चाचे नुकसान कोण भरणार. त्यापेक्षा ही निवडणूक रद्द करा, 14 गाव, 27 गाव आत्ताच बाहेर काढा. त्यांची स्वतंत्र नगरपरिषद, महानगरपालिका करा आणि घ्या निवडणुका. यात राजकारण कशाला करता, जनतेचे कराचे पैसे कशाला वाया घालवता असा संतप्त सवाल खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सत्ताधारी प्रशासनावर व निवडणूक आयोगाला केला. तसेच 27 गावासाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा ही दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com