

High Court
Esakal
मुंबई : मुलुंड येथे मेट्रोचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या अपघातानंतर मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिंकांचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी जनहित याचिकेमार्फत एका वकिलाने उच्च न्यायालयात केली आहे. मुंबईतील सर्व बांधकामाधीन मेट्रो प्रकल्पांवर तृतीय पक्षामार्फत सुरक्षा लेखापरीक्षण (थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट) करण्याची मागणी वकील रुजू ठक्कर यांनी जनहित याचिकेतून केली आहे.