

Mumbai Unauthorized School
ESakal
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी सुरू असतानाही शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धोरण आणले गेले नाही. यातच राज्याच्या राजधानीत अजूनही १६४ शाळा अनधिकृतपणे सुरू असून, या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठी शालेय शिक्षण, महापालिका शिक्षण विभाग कानाडोळा का करते, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा सवाल पालकांकडून केला जात आहे.