Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसंदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सर्वेक्षणही...

mumbai
mumbaisakal

-नितीन बिनेकर

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारने ‘एमयूटीपी -३ अ’ प्रकल्पासाठी सात हजार कोटींच्या कर्ज उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा वातानुकूलित करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने कंबर कसली आहे.

mumbai
आता 'या' चाचणीमुळे वयाच्या १८व्या वर्षी कळणार कर्करोगाचा धोका! अनुवांशिकतेवर क्लिनिक

पारंपरिक लोकलमधून वातानुकूलित लोकलमध्ये मुंबईकरांना योग्य पद्धतीने स्थलांतरित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. एका खासगी कंपनीला याचे काम दिले असून ही कंपनी वर्षभरात सर्वेक्षण अहवाल एमआरव्हीसीकडे सादर करणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. २०१९ पासून राज्य सरकारकडून प्रतिसाद नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. राज्यात सत्तापालटानंतर राज्य सरकारने सुधारित प्रकल्पाला अर्थसाह्य उभारण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणीच्या प्रक्रियेला चालना मिळाली आहे. एमयूटीपी-३ आणि एमयूटीपी-३ अ अंतर्गत २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता फक्त केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

mumbai
Bullock Cart Race : राज्यातील बैलगाडा शर्यती निर्बंध मुक्त होणार - खासदार श्रीकांत शिंदे

एसी लोकलला चांगला प्रतिसाद

वातानुकूलित लोकलची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी रेल्वेने तिकीट दर निम्म्याने कमी केले होते. त्यानंतर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या लोकलमुळे दरवाजामधून लटकून होणारे अपघात बंद झाले आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला ७९, तर मध्य रेल्वेवर ५६ फेऱ्या या वातानुकूलित लोकल चालवण्यात येत आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गाड्या भविष्यात पूर्णपणे एसी गाड्या होणार आहेत.

डिसेंबर २०२३ ची मुदत

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई उपनगरीय लोकलचे रूपांतर एसीमध्ये होणार असल्याने पारंपरिक नॉन-एसी गाड्यांमधून एसी लोकल गाड्यांचे स्थलांतर किंवा स्थलांतर कसे करावे याबद्दल अभ्यास करून धोरण तयार करणे आवश्यक आहे. यासाठी ‘सिस्टा’ या कंपनीची नियुक्ती केली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत एमआरव्हीसीने कंपनीला दिली आहे. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर एसी लोकल गाड्या कशा चालवायच्या याबद्दल धोरण ठरवले जाणार आहे.

तपशीलवार अभ्यास करणार

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात वातानुकूलित लोकल गाड्या समाविष्ट करण्यासाठी सध्याचा प्रवाशांचा तपशीलवार अभ्यास करणे आणि संभाव्य स्थलांतर धोरण तयार करणे हे कामाची व्याप्ती असणार आहे. सध्याच्या रहदारीचे मूळ-गंतव्य मॅट्रिक्स, प्रवासी प्रोफाईल, आराम आणि प्रवासाची सोय, गर्दी इत्यादींसंबंधी विद्यमान माहिती घेऊन अभ्यास केला जाणार आहे.

एमआरव्हीसीकडून पूर्वतयारी

सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत नव्या एसी लोकल एक किंवा दोन येत होत्या; परंतु भविष्यात उपनगरीय सेवेत नव्या एसी लोकलची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे नव्या एसी लोकल सरळसेवेत दाखल करत असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, वेळापत्रकावर परिणाम होऊन नये, याकरिता एमआरव्हीसी पूर्वतयारी करत आहे.

एसी तिकीट कमी होणार?

सर्व विनावातानुकूलित लोकल वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतरित झाल्यानंतर सामान्य प्रवाशांसमोर तिकीट भाड्याचा प्रश्न येणार आहे. या अभ्यासामध्ये प्रवाशांना तिकीट भाडे कमी झाल्यास तुम्ही वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणार का, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या उपनगरीय एसी लोकलची संख्या वाढल्यास वातानुकूलित एसी लोकलचे तिकीट दर कमी होणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com