

Mumbai entrance gate developement
ESakal
मुंबई : मुंबई महानगराच्या प्रवेशद्वारांचे रूप पालटणार आहे. वाशी, ऐरोली आणि मुलुंड या नाक्यांवर केवळ भव्य कमानीच नव्हे, तर नागरी सुविधांनी सज्ज अशी अद्ययावत संकुले (हब) उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला गती देण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी (ता.१०) प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी केली. या प्रकल्पाद्वारे पर्यटकांना सुविधा देण्यासोबतच महापालिकेचा महसूल वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.